Saturday, June 27, 2026
Home महाराष्ट्र Makranda Anaspure On Maratha Reserveation : समाज तुटू नये, समाज तुटला तर...

Makranda Anaspure On Maratha Reserveation : समाज तुटू नये, समाज तुटला तर अराजक निर्माण होेते- मकरंद अनासपुरे यांची मराठा आरक्षणाविषयीची प्रतिक्रिया.

Makranda Anaspure On Maratha Reserveation : हैद्राबाद गॅझेटच्या जीआरनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे, यावर मकरंद अनासपुरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी याविषयीचे मोठे वक्तव्य केले आहे.

मुंबई : 19/09/2025

सरकारने राज्यात हैद्राबाद गॅझेटचा जीआर काढला आहे. मात्र त्यानंतर राज्यात वातावरण तापले आहे. मराठा विरोधात ओबीसी समाज असं चित्र निर्माण झालं आहे. मराठी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेल्या हैद्राबाद गॅझेटला ओबीसी समाजाकडून जोरदार विरोध होत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नका अशी त्यांची मागणी आहे. या सगळ्या प्रकरणावर आता अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मकरंद अनासपुरे म्हणाले की, समाज तुटु नये, समाज तुटला तर अराजक निर्माण होते. तसेच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत द्यावी ही सरकारला विनंती आहे, असे देखील अनासपुरे यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

राज्यात सध्या हैद्राबाद गॅझेटवरून एक संघर्ष निर्माण झाला आहे, तो म्हणजे बंजारा समाज आणि आदिवासी समाज समोरासमोर संघर्षासाठी उभे ठाकले आहेत. हैद्राबाद गॅझेटनुसार आमचा समावेश हा एसटीमध्ये करावा अशी मागणी आता बंजारा समाजानं केली आहे. तर बंजारा समाजाच्या या मागणीला आदिवासी समाजानं जोरदार विरोध केला आहे. या मागणीविरोधात आदिवासी समाजाचे नेते एकवटले आहेत.

मकरंद अनासपुरेंची प्रतिक्रिया  (Maratha Reserveation )

राज्यात सध्या सुरू असलेल्या ओबीसी विरोधात मराठा आणि बंजारा विरोधात आदिवासी वादावर मकरंद अनासपुरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. समाज तुटू नये, समाज तुटला तर अराजक निर्माण होते. आपण भावंडांसारखे आणि एक समाज म्हणून राहतो. जेव्हा आपल्यावर संकट येते, तेव्हा एकत्रितपणे आपण धावून जातो. एका मोळीची आणि एका लाकडाची गोष्ट आपल्या सर्वांना माहिती आहे. मोळीच्या अवस्थेत आहोत तोपर्यंत तोडणे शक्य नाही आणि लाकूड होत गेलो तर तोडणं सोपं होईल, गावकी आणि भाऊकी एकत्र होती ती अशीच एकत्र रहावी हीच मनापासून भावना आहे, असं मकरंद अनासपुरे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

ते पुढे म्हणाले की, पाण्याची चळवळ आम्ही केवळ चालवली नाही, तर त्याचा दशकपूर्ती सोहळा साजरा केला आहे. यंदा पाऊस जास्त झाला, निसर्गाता अंदाज कोणालाही येत नाही. महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात निसर्गाचे रौद्ररूप पहायला मिळत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. सरकारने जास्तीत जास्त मदत करावी, अशी मागणी यावेळी अनासपुरे यांनी केली आहे.

RELATED NEWS

Pakistan Protest News, 2025, Big News : पाकिस्तानमध्ये राजकीय खळबळ ! इम्रान खान समर्थकांची शाहबाज-मुनीर विरोधात घोषणाबाजी : Pakistan Imran Khan Pti Protest Against...

Pakistan Protest News : सध्या पाकिस्तानात मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी रावळपिंडीत आणि इस्लामाबाद येथे उच्च न्यायालयाबाहेर मोर्चा...

Pimple Saudagar Fire Incident, Breaking News : पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाची तत्परता : Massive Fire Breaks Out At Commercial Building...

Pimple Saudagar Fire Incident : पुणे शहरातील पिंपळे सौदागरमधील एका व्यावसायिक इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. अशावेळी इमारतीच्या आत दाट धूर आणि...

Parliament Winter Session, Big News 2025 : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही गोंधळ, विरोधकांकडून ‘व्होट चोर गद्दी छोड’चा नारा : Chaos Continues In Parliament...

Parliament Winter Session : हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान दुसऱ्या दिवशीही गोंधळ झाला. चर्चेदरम्यान एसआयआर हा शब्द टाळून "निवडणूक सुधारणा" किंवा इतर नावाने हा विषय कामकाजात...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments